ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत
कोल्हापूर :
भारतीय शुगर या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर धंद्यासाठी काम करणार्या प्रथितयश अशा संस्थेकडून श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ठ ऊस विकासाबद्दलचा राष्ट्रीय पातळीवरील संपूर्ण देशातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार नॅशलन शुगर इन्स्टिट्युट कानपूरचे संचालक नरेंद्ग मोहन यांच्या शुभहस्ते व भारतीय शुगरचे मुख्य संपादक आणि संस्थापक चेअरमन विक्रमसिंह शिंदे तसेच साखर उद्योगातील प्रतिष्ठीत मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे शनिवारी दि.२१ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदान करण्यात आला. विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप व संचालक मंडळातील सदस्यांनी आणि अधिकारी वर्गाने तो स्विकारला.
या पुरस्काराबद्दल बोलताना विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, श्रीविघ्नहर कारखान्याने गत वर्षीच्या हंगामात उत्कृष्ठ अशा ऊस विकास यंत्रणेचा वापर करुन ऊसाचे एकरी उत्पादनामध्ये आघाडी घेत संपूर्ण पुणे जिल्ह्यात उच्चांकी असे प्रथम क्रमांकाचे म्हणजेच १० लाख ७५ हजार ०७५ मे. टन इतक्या ऊसाचे गाळप केले असून त्यापासून १२ लाख ५३ हजार ९२० क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे. त्याचबरोबर ११.६५% साखर उतारा राखण्यात यश मिळविले. विघ्नहर कारखान्याकडून ऊस विकास व संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना तसेच ऊसाचे एकरी उत्पादनात वाढ होण्यासाठी ऊस उत्पादक शेतकर्यांना पुरवित असलेल्या सोईसुविधा, सवलती व उत्पादन वाढीसाठी देत असलेल्या प्रोत्साहन आदि बाबींचा विचार होवून विघ्नहर कारखान्यास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चेअरमन सत्यशिल शेरकर पुढे म्हणाले की, भारतीय शुगर या संस्थेकडून संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ठ ऊस विकासाबद्दलचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला त्यामुळे श्री विघ्नहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे सांगून जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी व जनतेच्यादृष्टीने ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर व माजी चेअरमन स्व.सोपानशेठ शेरकर यांच्या आर्दशाप्रमाणे विघ्नहर कारखान्याची यशोपताका उंचावली जात असून व्हाईस चेअरमन, सर्व संचालक यांच्या साथीने व सर्व सभासद बंधू-भगिनी, जेष्ठांचा आशिर्वाद, ऊस उत्पादक, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने विघ्नहर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे सत्यशिल शेरकर यांनी नमूद केले. आगामी सन २०१९-२० गाळप हंगामात सुमारे ८ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने गाळप हंगामाची जोरदार तयारी सुरु असल्याचे त्यांनी याप्रसंगी संगितले.
कार्यकारी संपादक : अमर भागवत
कोल्हापूर :
भारतीय शुगर या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर धंद्यासाठी काम करणार्या प्रथितयश अशा संस्थेकडून श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ठ ऊस विकासाबद्दलचा राष्ट्रीय पातळीवरील संपूर्ण देशातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार नॅशलन शुगर इन्स्टिट्युट कानपूरचे संचालक नरेंद्ग मोहन यांच्या शुभहस्ते व भारतीय शुगरचे मुख्य संपादक आणि संस्थापक चेअरमन विक्रमसिंह शिंदे तसेच साखर उद्योगातील प्रतिष्ठीत मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे शनिवारी दि.२१ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदान करण्यात आला. विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप व संचालक मंडळातील सदस्यांनी आणि अधिकारी वर्गाने तो स्विकारला.
या पुरस्काराबद्दल बोलताना विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, श्रीविघ्नहर कारखान्याने गत वर्षीच्या हंगामात उत्कृष्ठ अशा ऊस विकास यंत्रणेचा वापर करुन ऊसाचे एकरी उत्पादनामध्ये आघाडी घेत संपूर्ण पुणे जिल्ह्यात उच्चांकी असे प्रथम क्रमांकाचे म्हणजेच १० लाख ७५ हजार ०७५ मे. टन इतक्या ऊसाचे गाळप केले असून त्यापासून १२ लाख ५३ हजार ९२० क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे. त्याचबरोबर ११.६५% साखर उतारा राखण्यात यश मिळविले. विघ्नहर कारखान्याकडून ऊस विकास व संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना तसेच ऊसाचे एकरी उत्पादनात वाढ होण्यासाठी ऊस उत्पादक शेतकर्यांना पुरवित असलेल्या सोईसुविधा, सवलती व उत्पादन वाढीसाठी देत असलेल्या प्रोत्साहन आदि बाबींचा विचार होवून विघ्नहर कारखान्यास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चेअरमन सत्यशिल शेरकर पुढे म्हणाले की, भारतीय शुगर या संस्थेकडून संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ठ ऊस विकासाबद्दलचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला त्यामुळे श्री विघ्नहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे सांगून जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी व जनतेच्यादृष्टीने ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर व माजी चेअरमन स्व.सोपानशेठ शेरकर यांच्या आर्दशाप्रमाणे विघ्नहर कारखान्याची यशोपताका उंचावली जात असून व्हाईस चेअरमन, सर्व संचालक यांच्या साथीने व सर्व सभासद बंधू-भगिनी, जेष्ठांचा आशिर्वाद, ऊस उत्पादक, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने विघ्नहर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे सत्यशिल शेरकर यांनी नमूद केले. आगामी सन २०१९-२० गाळप हंगामात सुमारे ८ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने गाळप हंगामाची जोरदार तयारी सुरु असल्याचे त्यांनी याप्रसंगी संगितले.
























