Saturday, October 19, 2019

नारायणगाव पोलिस ठाणेच्या हद्दीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३१० जणावर प्रतिबंधात्मक कारवाई, ४० जण हद्दपार

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत 



नारायणगाव :
                  विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तडीपारीचे आदेश मा. जितेंद्र डुड्डी, (IAS) सहायक जिल्हाधिकारी, मंचर व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना यांनी तडीपारीचे आदेश काढले असून
 नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने ३०५ जणांवर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करण्यात आली, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
               सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी सांगितले की, पोलीस स्टेशन अंतर्गत कलम १०७ प्रमाणे ७५ इसमांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून बाँड लिहून घेण्यात आले आहेत. कलम कलम ११० प्रमाणे ०३ इसमांवर कलम १४९ प्रमाणे १८५ इसमांना नोटीस देण्यात आले आहे. कलम १४४ (२) प्रमाणे २७  इसमावर निवडणुकीच्या काळात जुन्नर तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. कलम ५५ प्रमाणे १ प्रस्ताव ४ इसमावर हद्दपार करण्याचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत. कलम ५६(ब) प्रमाणे १ सराईत इसमांविरोधात हद्दपार प्रस्ताव पाठवला असून कलम ९३ प्रमाणे ८ इसमावर प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे तसेच. नारायणगाव  पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यावर दारूबंदीसाठी छापे घालण्यात आले असून २३,४६४  हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
               पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, जुन्नर विभाग उपविभागीय पोलीसअधिकारी दिपाली खन्ना  यांच्या मार्गदर्शनाने तसेच सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, ASI केंगले, ASI ढमाले, पो.ना लोंढे, पो.ना. शिंदे, पो.शि. लोहार, पो.शि. वाघमारे, पो.शि. कोबल, पो.शि. साबळे, पो.शि. दुपारगुडे. पोशि. गारगोटे, पो.शि. राक्षे यांनी कामगिरी बजावली आहे.




Wednesday, October 16, 2019

विघ्नहर कारखान्याचे ३४ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नि प्रदीपन उत्साहाच्या वातावरणात संपन्न

ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
कार्यकारी संपादक : अमर भागवत 




शिरोली : 
               श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक भगवंत घोलप तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी पुष्पाताई अशोक घोलप या उभयातांच्या हस्ते आज बुधवारी (दि.१६) सकाळी-१० वाजता मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर हे होते.


                याप्रसंगी चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सुमित्राताई शेरकर, जयहिंदचे तात्यासाहेब गुंजाळ, नंदूकाका शेरकर, गणपत शेटे, पांडुरंग गाडगे, रविंद्ग माळी, वैभव कोरडे, प्रदीप थोरवे, अजितकाका परदेशी, हाजरा इनामदार,  अर्चना भुजबळ, तान्हाजी बेनके, संभाजी पोखरकर, वल्लभ शेळके, जानकू डावखर, रामदास बोर्‍हाडे, गजानन हाडवळे, विजय भोर विवेक काकडे, रामदास महाबरे विघ्नहरचे सर्व आजीमाजी संचालक, पंचक्रोशितील विविध गांवाचे सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायट्याचे चेअरमन, ऊस उत्पादक शेतकरी, पत्रकार बंधू, सर्व अधिकारी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
               व्हाईस चेअरमन अशोक भगवंत घोलप म्हणाले की, विघ्नहर कारखान्याने उत्कृष्ठ कारभार करत अनेक पुरस्कार प्राप्त केले असून विघ्नहरच्या या सर्व यशामध्ये सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी/वाहतूक कामगार, कर्मचारी अधिकारी वर्ग यांचा मोठा वाटा असल्याचे सांगून आगामी गाळप हंगामातही विघ्नहर कारखान्याचा यशाची कमान चढतीच राहिल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
                अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, ३४ व्या गळीत हंगामाची सर्व तयारी पूर्ण झाली असून मंत्री समितीच्या बैठकीनंतर गाळप हंगाम सुरु करणेची तारीख निश्चित होणार  असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि कारखान्याची गाळप हंगामाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की गाळप हंगामच्या दृष्टीने तोडणी यंत्रणेची व्यवस्थीत बांधणी करण्यात आली असून कार्यक्षेत्रात यंदा सुमारे ८ लाख मे.टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभासद व ऊस उत्पादकांनी सर्व नोंदींचा व नोंद नसलेला बिगर नोंदीचा ऊस नोंद करुन घेवून विघ्नहरला गाळपासाठी घालावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 


                    विघ्नहर कारखान्यास यावर्षीही नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचेकडून उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेबद्दलचा देशातील पहिल्या क्रमांकाचा सलग तिसर्‍यांदा पुरस्कार मिळाला असून साखर धंद्यात अग्रगण्य असलेल्या भारतीय शुगर या संस्थेकडूनही सर्वोत्कृष्ठ ऊस विकासाबद्दलचा राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.         जुन्नर तालुक्याच्यादृष्टीने ही अतिशय भूषणावह बाब असल्याचे सांगून या पुरस्कारांबद्दल सर्व सभासद, ऊस उत्पादक, अधिकारी व कामगार वर्ग यांचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी यावेळी अभिनंदन केले.


                        चेअरमन सत्यशिल शेरकर पुढे म्हणाले सध्या साखरेचे बाजारभाव ३१००/- रु.चे आसपास आहेत. परंतु साखरेचा उत्पादन खर्च ३४०० ते ३५०० चे आसपास आहे. शासनाने साखरेची किमान विक्री किंमत ३६००/- प्रती क्विंटल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, सध्या ऊस उत्पादकांच्यादृष्टीने अडचणीची बाब म्हणजे खोडवा व लागणीच्या ऊसाला हुमणी किडीचा प्रार्दुभाव होत होता. त्यासाठी विघ्नहर कारखाना ऊस विकास विभागा मार्फत योग्य मार्गदर्शन करत असून त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा.विघ्नहरने मोठ्या प्रमाणावर भुंगेरे गोळा करणेची मोहिम राबविली. त्याचा परिणाम म्हणुन हुमणीचा प्रार्दुभाव कमी झाल्याने ऊसासह इतर पिकांचीही होणारी नुकसान कमी होणेस मदत झाली आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी कारखान्याचे लागवड धोरणानुसार जर ऊसाची लागवड केली तर तोडणीचे नियोजन योग्यप्रकारे होऊन ऊसाची तोडणी वेळेवर करता येईल असे सांगून ते म्हणाले की, स्व.शेठबाबांचे विचाराचा वारसा व आण्णांचे मार्गदर्शनाचे शिदोरीवर विघ्नहरच्या यशाचा रथ सदैवपणे पुढे नेत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रारंभी उभयतांच्या हस्ते बॉयलरची विधिवत पुजा करण्यात आली. कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक राजेंद्ग जंगले यांनी स्वागत केले. यावेळी माजी संचालक रंगनाथ घोलप, शरद चौधरी आदिंनी आगामी गाळप हंगामाकरीता शुभेच्छा व्यक्त केल्या.सुत्रसंचालन सुहास शेटे यांनी केले तर आभार संचालक देवेंद्ग खिलारी यांनी मानले.