Saturday, January 30, 2021

झाडे लावा झाडे जगवा !ऑक्सिजन'ची खरी गरज आहे हे कोरोना कालावधीत पाहायला मिळाले - भास्करराव पेरे पाटील


झाडे लावा झाडे जगवा !ऑक्सिजन'ची खरी गरज आहे हे कोरोना कालावधीत पाहायला मिळाले - भास्करराव पेरे पाटील
       
   नारायणगाव(विशेष प्रतिनिधी) दि.३० माणसाला खरी ऑक्सिजनची गरज आहे.
कोरोना महामारी कालावधीत औषधांपेक्षाही ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावण्याची
उदाहरणे आहेत,म्हणून झाडे लावली पाहिजे.
झाडे लावली तर आपल्याला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळू शकतो. असे मत पाटोदा( जि. औरंगाबाद) ग्रामपंचायत'चे माजी सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील  यांनी नारायणगाव 
ग्रामपंचायत व व समविचारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रत व्यक्त केले.
  जुन्नर तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत व पंचायत राज याविषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन मुक्ताई समाज मंदिर कार्यालय येथे करण्यात आले होते.
          या वेळी प्रमुख वक्ते भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी,हिवरे तर्फे नारायणगाव,
गुंजळवाडी,खोडद,निमदरी,येडगाव,आर्वी, मांजरवाडी, उदापूर व इतर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
                   राजगुरूनगर बँकेचे संचालक किरण मांजरे,समविचारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वारुळे,उपाध्यक्ष आशिष माळवदकर,
सचिव राखी रत्नपारखी,हर्षल मुथ्था, पंचायत समिती सदस्या अर्चनाताई माळवदकर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे,
स्थानिक उपसरपंच सौ.सारीकाताई डेरे,आरीफभाई आतार,संतोष दांगट,संतोष पाटे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, माजी सरपंच ज्योतिताई दिवटे,ग्रामपंचायत सदस्या सौ. आश्विनीताई ताजणे,सौ.सुप्रियाताई खैरे,रुपालीताई जाधव,सौ.मनिषाताई मेहेत्रे,सौ.पुष्पाताई आहेर,सौ.कुसुमताई शिरसाठ,सौ.संगीताताई खैरे,सदस्य गणेश पाटे,राजेश बाप्ते,रामदास अभंग ,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
   पेरे पाटील म्हणाले की,प्रत्येक खात्याची तपासणी झाली पाहिजे,तपासणी झाल्यास आढावा घेतल्यास,त्या संस्थेचा ताळेबंद समजू शकतो!करण्यासारखं भरपूर काही आहे!मात्र इच्छाशक्ती पाहिजे असे सुरुवातीला सांगून,ते पूढे म्हणाले की,१)पिण्याचे पाणी स्वच्छ वापरले पाहिजे २) सांडपाणी जमिनीत जिरविले पाहिजे,किंवा पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा राबविली पाहिजे ३) मुलांना शिक्षण दिले जावे! ४) झाडे लावली पाहिजे ५) अनाथांना,निराधार व्यक्तींना मोफत जेवण दिले पाहिजे.
             माणसाचे आयुष्य का कमी झाले या विषयावर बोलतांना पेरे पाटील म्हणाले की,माणसाला मोकळा श्वास अर्थात ऑक्सिजन घेण्यासासाठी माणसाकडे वेळ नाही!सर्वत्र घुसमट निर्माण झाली आहे.जमीन आहे तितकीच आहे मात्र लोकसंख्या वाढली आहे.त्यामुळे झाडे लावण्याऐवजी तोडली जात आहेत.झाडे लावा झाडे जगवा!हा मोलाचा संदेश त्यांनी या वेळी दिला!झाडे नसल्याने ऑक्सिजन कमी झाला आहे.झाडे असतील तर ऑक्सिजन वाढेल!पाटोदा या आमच्या गावात रस्त्याने लोकं नारळ तोडून खातात,झाडे लावा आणि त्यातही फळ झाडे लावा! आम्ही आमच्या गावात यंदा आणखी एक प्रयोग केला तो म्हणजे वेल (भोपळा,दोडके,कारले)अशा भाजीपाला साठी वेल लावले!आहेत.
             महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हे सांगितले आहे.संत सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी!असे का ? म्हटले,तुमची इच्छा असेल तर खूप काही करता येऊ शकते असा संदेश संतांची उदाहरणे देऊन पेरे पाटलांनी आपल्या पाऊण तासाच्या भाषणात नारायणगावकरांची माने जिंकली!ग्रामसेवक कपिला गाय आहे!त्यांच्या पोटात तेहतीसकोटी देव आहेत.त्यांच्याशी वाद घालून कामे करण्यापेक्षा त्यांच्याशी जुळवून घेऊन कामे केली पाहिजे! काम करणारालाच नावे ठेवली जातात!परंतू लोकांची नाडी ओळखा आणि कामे करा!आम्ही तेच केले.तुम्हीही करा!असा संदेशही नवनिर्वाचित सदस्यांना त्यांनी दिला!
         पुणे जिल्हा परिषदेचे माजी कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर साहेब यांनी आपल्या कार्यकाळातील ग्रामपंचायतीसाठी कामधेनू योजना राबविली आणि काय फायदा झाला,यावेळी चाळीस ग्रामपंचायतींची निवड केली होती. त्यातून ग्रामस्थांना काय फायदा झाला हे सांगितले!
        सौ.राखी रत्नपारखी यांनी प्रमुख वक्ते भास्करराव पेरे पाटील यांचा परिचय करून दिला!
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष माळवदकर आणि हेमंत कोल्हे यांनी केले!आभार लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी मानले.

No comments:

Post a Comment