ग्राहक समाचार ( साप्ताहिक / वेब चॅनल) [ ग्राहक संरक्षण समितीचे खुले व्यासपीठ ]
उप संपादक : श्रीनिवास शिंदे, अहमदनगर.
उप संपादक : श्रीनिवास शिंदे, अहमदनगर.
नगर-
नगर येथील ज्योती क्रांती शिक्षण, आरोग्य, क्रीडा व ग्राम विकास प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच जिल्ह्यातील अनेक शाळांना "जोती सावित्री पुरस्कार" जाहीर करण्यात आले. अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्याचा पुरस्कारासाठी निवड समितीच्या वतीने निवड करण्यात आली. या पाच जिल्ह्यात असणाऱ्या जामखेड, जवळा, खर्डा, नान्नज, अरणगाव, हळगाव, फक्राबाद, पिंपरखेड, दिघोळ, कर्जत, राशीन, मिरजगाव, पाथर्डी, नगर, नागापूर, श्रीगोंदा, राहुरी, नेवासा, चापडगाव, पाटोदा, आष्टी, कडा, अंमळनेर, शिरुर कासार, केज, वडवणी, गेवराई, बीड,भुम, वाशी, उस्मानाबाद, तेरखेडा, परांडा, शेळगांव, ईट, पाथुड,सोलापूर, करमाळा, कुर्डुवाडी, टेंभुर्णी, बार्शी, अकलूज, दौंड, शिरुर, पुणे, इंदापूर या शहरांचा आणि गावांतील सुमारे २५६ विद्यालयांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. ज्ञानदानासारखे अत्यंत महत्त्वाचे कार्य करुन भारताचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या शिक्षक आणि विद्यालयांच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांसाठी हा पुरस्कार भविष्यात निश्चितच प्रेरणा देण्याचे काम करेल, अशी अपेक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्योती क्रांती कॉ-ऑप क्रेडीट सोसायटी लि.चे चेअरमन आजिनाथ हजारे यांनी व्यक्त केली. अशी माहिती ज्योती क्रांती प्रतिष्ठानचे किरण वरपे यांनी दिली.
No comments:
Post a Comment